तु एकट संध्यासमयी
या पाण्यावरली ओळ
सांग कशाने लिहिले
तु थेंबांवर आभाळ ?
या पाण्यावरली ओळ
सांग कशाने लिहिले
तु थेंबांवर आभाळ ?
हे लखलखती नव्याने
भगव्या देहाने विश्व
सुनसान ह्र्दयतीरावर
धावती कशाला अश्व
शांत सावल्यांभवती
तुझी उदासीन माया
तु थरथरते आलिंगन
अंधार पुर्ण सजवाया
उजळुन निघायासाठी
तोही घरभर फ़िरला
अन दिवेलागणीसाठी
तु निरांजनावर धरला
जीव जळाला म्हणुनी
डोळ्यात क्षणभर ओल
करुणेची साधुन वेळ
अंगणात पडावे फ़ुल
सुन्न जरासा दर्वळ
वा-यावर फ़िरत रहातो
तु शब्द तयाला देता
तो आभाळाला जातो
कवितेचा हट्ट्च होता
“निळ्या फ़ुलांची रात”
अशात ओंजळ ठरतो
तुझाच लिहिता हात
—एस. के. [ निळ्या फ़ुलांची रात ]

Bharat Javale म्हणाले,
जुलै 29, 2011 at 1:19 pm
Like this is beautiful