तुच लिहुन द्यायचीस
तुझ्यासकट
या प्रहर-कथा….
ढगांच्या तळहातावर
एखादा ओघळ अडवुन
‘आभाळ’ थांबवायचीस…
अन..
तो कलंडता जन्म
अस्ताच्या लक्ष वेळा
जगुन घ्यायचा…
तेव्हा …शांत असायचा (अजुन आहेच…)
स्मरणांच्या
लख्ख प्रदेशातला
अखेर मत्रं गाभारा…
आत भरला वारा..
आत्मलीन…
“सांध्यकळस”
अन, संध्यामग्न दिवस…
अगदी कथेच्या
तु माझ्यासकट
सुचवलेल्या (न ठरलेल्या)
…शेवटापर्यंत…….
-एस. के.
[मला कधी हे सुचलंच नाही...कदाचीत कोसळलो असतो दोघेही]
